Home Breaking News काळाने साधला घात; वीज कोसळून महिलेचा मृत्यू

काळाने साधला घात; वीज कोसळून महिलेचा मृत्यू

◆ जनावरे हाकत घरी परतताना दुर्दैवी घटना

वणी वृत्तवेध :-तालुक्यातील कुंभारखनी येथे सोमवारी सायंकाळी निसर्गाच्या रौद्र रूपाने एका महिलेचा जीव घेतला. सुरेखा सुधाकर चट्टे (वय ४०) या शेतातून जनावरे घेऊन परतत असताना त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या भीषण घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना मंगळवारी घडली असून गावात शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, सुरेखा चटे या पतीसह शेतात जनावरे चारण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला. काळे ढग दाटून येत विजांचा कडकडाट सुरू झाला. पती घरी परतल्यानंतर सुरेखा या जनावरांची व्यवस्था करून घरी येत होत्या. मात्र, निसर्गाने अचानक घाला घालत त्यांच्या अंगावर वीज कोसळली.

बराच वेळ त्या घरी न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. शोध घेतला असता त्या शेतात निपचित अवस्थेत आढळून आल्या. ही घटना समजताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous articleडॉ. दिलीप अलोने शुक्रवारी सह्याद्री वाहिनीवर
Next articleमनसे नेते उंबरकर सह अन्य दोघांवर गुन्हे दाखल
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे