Home Breaking News शहराच्या सभोवताल ठिकठिकाणी रेतीचे ढिगारे

शहराच्या सभोवताल ठिकठिकाणी रेतीचे ढिगारे

◆ महसूल प्रशासन दुर्लक्ष ?
◆ रेती साठ्यांच्या चौकशीची मागणी

वणी वृत्तवेध :तालुक्यातील रेती घाटांची मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे करण्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या बाजारात रेतीला अपेक्षित दर मिळत नसल्याने अनेक घाटधारकांनी रेती साठवणुकीवर भर दिल्याची चर्चा सुरू आहे. शहरातील विविध लेआऊटमधील मोकळ्या जागा, रस्त्यालगतचे परिसर तसेच शहराबाहेरील ठिकाणी रेतीचे मोठमोठे ढिगारे उभे राहत असून याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, रेती घाट बंद झाल्यानंतर कृत्रिम टंचाई निर्माण करून हीच रेती चढ्या दराने विकली जाते, असा आरोप वारंवार होत असतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरबांधणीसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. शासनाच्या नियमांना हरताळ फासत अनेक ठिकाणी अवैधरीत्या रेती साठवली जात असल्याची चर्चा असून संबंधित विभाग मात्र मौन बाळगून आहे.

रेती साठवणुकीसाठी परवानगी घेण्यात आली आहे का, साठ्याची नोंद महसूल विभागाकडे आहे का, तसेच रॉयल्टी भरली आहे का याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरात आणि शहराबाहेर सुरू असलेल्या या रेती साठेबाजीमागे नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. महसूल प्रशासनाने तातडीने संयुक्त पथक तयार करून तपास मोहीम राबवावी, अन्यथा मोठ्या प्रमाणात रेतीचा काळाबाजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Previous articleचंद्रपूरहून घरी येताना काळाचा घाला
Next articleरात्री बकऱ्या चोरायचे, दिवसा बाजारात विकायचे
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे