◆ दुपारी 1वाजता जाहीर होणार
वणी वृत्तवेध :फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता १२वीच्या परीक्षेचा निकाल शनिवार, २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.विद्यार्थ्यांना आपला निकाल विविध अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन पाहता येईल. तसेच गुणपत्रिकेची प्रिंट काढता येईल आणि DigiLocker अॅपमध्ये डिजिटल मार्कशीटही मिळणार आहे.

निकालानंतर ज्यांना आपल्या गुणांबाबत शंका असेल, त्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी ३ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. त्यानंतर ५ दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल.

तसेच पास झालेल्या विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी पुढील तीन संधी मिळणार आहेत. पुरवणी परीक्षेसाठी अर्जाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. ही माहिती अमरावती विभागीय मंडळाने दिली आहे.










